Sunday 2 February 2014

मोठा गैरसमज

          "श्रीमानयोगी" वाचून झाली ,एका मित्राला मी दिली वाचायला तर तो म्हणाला कि "अरे त्या पुस्तकात नुसत इमोशनल दाखवलय ,शिवाजी महाराजांचा पराक्रम कमी आणि त्याचं आयुष्यातलं बाकीचच जास्त दाखवलय ." तेव्हा खरच मला कीव आली त्याच्या आणि त्याच्यासारख्या विचार करणाऱ्या मुलांची ,आणि हा खूप महत्वाचा विषय आहे .. कारण आज थोर महात्म्यांच्या नावाखाली चाललेला जो धिंगाणा आहे त्यामागे हेच तर मूळ आहे ..
               रणजीत देसाई यांची 'श्रीमानयोगी' असो किंवा 'स्वामी' ,अथवा शिवाजी सावंत यांची 'युगंधर' असो वा 'मृत्युंजय' किंवा ना.स.इनामदार यांची 'राऊ' ,या सर्व पुस्तकांमध्ये एक समान धागा हा आहे कि यात त्या त्या नायकांच मनोविश्व उलगडण्याचा अतिशय छान प्रयत्न केला गेलाय .. युगंधर मध्ये कृष्ण हि व्यक्तिरेखा नुसती देव किवा अवतारी पुरुष म्हणून नाही वावरत तर कृष्ण हा एक सामान्य माणूस म्हणून वावरतो ,त्याचा आयुष्यात प्रत्येक घडणाऱ्या घटनेत त्याच्या मनाची होणारी होणारी घालमेल ,आनंद ,दुख ,कधी-कधी मनाची होणारी अस्वस्थता हे सर्व दाखवलय ,हेच श्रीमानयोगी मध्ये शिवाजी महाराजांबद्दल आणि स्वामी मध्ये पेशवा माधवरावाबदल दाखवलं गेलय .. श्रीमानयोगी मध्ये तर शिवाजी महाराज नुसते पराक्रमी इतिहासपुरुष एवढेच मर्यादित न ठेवता ,महाराज एक माणूस म्हणू कसा विचार करत असतील ,त्यांनाही आयुष्यात सुख-दुख ,आनंद-निराशा आलेच कि तरी पण त्यांनी या सर्वांवर मात करत ध्येयाकडे त्यांची वाटचाल कशी चालू ठेवली आणि स्वीकारलेल्या तत्वांवर आयुष्यभर कसे जगले हे सर्व अतिशय छान पद्धतीने मांडले आहे ,आज शिवाजि महाराजांच्या लढाया बद्दल सर्व माहिती कुठूनही मिळेल पण एक माणूस म्हणू ते कसे होते हे फार कमी ठिकाणी वाचायला मिळेल म्हणून इतिहासाकडे फक्त इतिहास म्हणून न पाहता त्याकडे मानवी दृष्टीकोनातून पाहणारी पुस्तके जरूर वाचायाल हवीत ..  
        श्रीमानयोगी व स्वामी यासारखी पुस्तके जी फक्त घडलेल्या घटनांकडे इतिहास म्हणून न पाहता ,त्या घटनांना असनाऱ्या मानवी कांगोरयाकडे पण पाहतात ,तीच पुस्तके काळाची गरज बनली आहेत ..मला खरच वाटत कि आपला इतिहास हा तर सर्व तरुणांपर्यंत पोहोचन गरजेच आहेच ,पण नुसता इतिहास पोहचून उपयोग नाही तर इतिहासात दडलेले विचार ,मानवी मनांचे संघर्ष हे पण पोहोचन तितकच गरजेच आहे .. तरच शिवाजी महाराज असो वा कुठलाही थोर व्यक्ती ,त्यांच्या नावाने उदो-उदो करण्यातच आनंद वाटून घेणारे तरुण त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गावर चालयला लागतील ..अशा वेळेला श्रीमानयोगी व स्वामी यासारखी पुस्तके जी फक्त घडलेल्या घटनांकडे इतिहास म्हणून न पाहता ,त्या घटनांना असनाऱ्या मानवी कांगोरयाकडे पण पाहतात ,तीच पुस्तके काळाची गरज बनली आहेत ..

                                                                                                         - सुधीर 

No comments:

Post a Comment