Tuesday 7 July 2015

धाग्या-धाग्याच आयुष्य ...


           धाग्या-धाग्याच आयुष्य हे .. धागा म्हटलं कि त्याच दुसऱ्या धाग्यात विणण आलं आणि त्यातून पुन्हा उसवण आलं .. धाग्याची गोष्ट अशीच सुरु राहते ,त्याच आयुष्य हे पुन्हा पुन्हा उसवण आणि पुन्हा पुन्हा विणण यातच सामावलेलं असतं .. तशीच काही गोष्ट असते आपल्या आयुष्याची नाही का .. 
             जन्म घेताच हे आयुष्याचे धागे विणले जातात ते आई वडील यांच्यासोबत ,नंतर नातेवाईक भाऊ बहिण ,मित्र ,मैत्रिणी ,प्रियकर ,प्रेयसी आणि जस जस आयुष्य पुढे वाढत जात तस तस या आयुष्याच्या धाग्यात गुंतत जातात अनेक इतर धागे आणि त्यातून बनत जातात नात्यांचे बंध .. आणि नात्यांच्या बंधात गुंतता गुंतता मध्येच उसवण पण वाट्याला येत या धाग्याच्या .. काही बंध गुंतले जातात आणि काही उसवले जातात ,आणि हे आयुष्य बनत उसावण्या-गुंतण्याच खेळ .. पण हे उसवण आणि गुंतण इतक सोप्प असत तर ते आयुष्य कसलं .. 
              हे आपल मन या या उसवाण्याच्या आणि गुंतण्याच्या खेळात अडकलेल असत .. म्हणून तर समजून उमजून मांडलेला खेळ असो वा नकळतपणे मांडला गेलेला खेळ असो ,मन हे त्या खेळात गुंतत जातेच .. आणि मजेशीर गोष्ट अशी कि मनाला या खेळात गुंतण तर खूप चांगल जमत पण त्यातून बाहेर पडण मात्र अवघड जात .. म्हणून तर कोणी आपलं असं वाटणार जेव्हा दूर जात ,त्या नात्यातून आपल आयुष्य उसवलं जात तेव्हा चांगल नाही वाटत या मनाला .. आणि जेव्हा हा एकटेपणा दूर करणारे ,पुन्हा नव्या स्वप्नांची उमेद जागवणार कोणीतरी नवीन असं या आयुष्यात गुंतलं जात तेव्हा मात्र हे मन अगदी आनंदित होत .. 
            पण शेवटी हे आयुष्य असच आहे नाही का .. कधी गुंतायचं कधी उसवायचं .. गुंतलं कोणात हा धागा तर तो बंध घट्ट बांधायचा म्हणजे कधी सहजा-सहजी उसवू नये आणि जर कधी उसवलचं तर पुन्हा नव्या वाटा ,नवी दिशा ,नवे आकाश ,नवी स्पंदने शोधायसाठी सज्ज व्ह्यायचं आणि त्या नव्या स्वप्नांमध्ये पुन्हा नव्याने गुंतायचं  .. असच असतं धाग्या धाग्याच आयुष्य हे ......
धाग्या धाग्या सारख आयुष्य हे 
 गुंतता गुंतता उसवत हे अन 
उसवता उसवता गुंतत हे 
पण या गुंतण्याच्या उसवण्याच्या खेळात ,
या मनाला नेहमी फसवत हे
कधी उसवत तर कधी विणत हे 
धाग्या धाग्या सारखं आयुष्य हे .. गुंतण्या-उसवण्याचं आयुष्य हे ….. 

                                                                                  - सुधीर