Thursday 13 February 2014

सॉक्रेटीस आणि गीता

               

               सॉक्रेटीस आणि गीता यांचा तसा काही संबंध नाही ,पण जर तो आला असता तर पाश्चात्य तत्वज्ञानच बदलून गेले असते .सॉक्रेटीसला पाश्चात्य तत्वज्ञानाचा जनक म्हणतात .सॉक्रेटीसने त्याच्या आयुष्यात कुठलेच तत्वज्ञान सांगितले नाही पण त्याने तत्कालीन तत्वज्ञानाला आव्हान जरूर दिले आणि पाश्चात्य लोकांना विचार करण्यास भाग पाडले .
                सॉक्रेटीसची पद्धत अशी होती कि तो "धर्म काय आहे ?" किंवा "न्याय काय आहे ?" असे प्रश्न विचारात असे ,आणि त्यावर जी उत्तर मिळतील त्या उत्तरांना सर्व बाजूंनी पडताळून तो त्यातूनपण प्रश्न उभा करत असे .म्हणजे त्याला कुणी धर्म म्हणजे काय याविषयी सांगितले कि "धर्म म्हणजे दान करणे ." तर तो लगेच विचारत असे कि "माझ्याकडे काहीच नसताना दान करणे धर्म कस असू शकत ,आणि जर हेच धर्म आहे तर  ते सर्व जणांना लागू व्हायला पाहिजे ,परिस्थितीनुसार धर्म बदलत नसतो ,मग धर्म म्हणजे नक्की काय ?" अशाच पद्धतीने तो लोकांना त्यांच्या धारणा व समजुती पुन्हा एकदा पडताळून पाहायला लावत असे .त्याच हे सर्व तत्वज्ञान गुरु शिष्य यांच्यात चालणाऱ्या संवादाच्या रूपाने सापडते जे त्याचा शिष्य 'प्लेटो' ने नंतर लिहून ठेवले आहे .    
              पण सॉक्रेटीसला त्याचा या धर्म ,न्याय ,वास्तव म्हणजे काय ,ईश्वर म्हणजे कोण या प्रश्नांची उत्तरे नाही मिळाली .त्याने लोकांना अंतर्मुख करायला जरूर लावले पण त्याच प्रश्नांची उत्तरे द्यायला त्याला पण नाही जमले .म्हणून माझ्या मनात हा विचार आला कि सॉक्रेटीसचा काळ हा साधारणपणे ई .स .पुर्व ४००-५०० दरम्यानचा ,म्हणजेच भगवतगीता श्रीकृष्णाने सांगितली त्यांनतर १००० वर्षानंतरचा .म्हणजेच सॉक्रेटीसला पडणाऱ्या या सर्व प्रश्नांची उत्तरे खर तर गीतेत आहेत ,धर्म म्हणजे काय ,न्याय म्हणजे काय ,ईश्वर म्हणजे कोण या सर्व प्रश्नांची उत्तरे गीतेत दिली आहेत .आणि नुसती उत्तरे नाही तर त्या उत्तरांना जगण्यात कस वापरायच हे पण गीतेत सांगितलं आहे . 
              यातून आणखी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे ,गीतेचं महात्म्य .ज्या काळात कृष्णाने गीता सांगितली तो काळ असा होता जेव्हा जगात कुठेही ठोस अस तत्वज्ञान अस्तित्वात नव्हते ,म्हणूनच भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला तत्वज्ञानाच्या रूपाने गीतेने पहिला-वहिला डोस पाजला असे म्हणायला हरकत नाही .म्हणूनच अस वाटत कि जर सॉक्रेटीसला गीता वाचायला मिळाली असती तर त्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरे नक्कीच मिळाली असती आणि आज स्वतःला विकसित म्हणून घेणाऱ्या पाश्चिमात्य देशाचं तत्वज्ञान आणि विचारसरणी वेगळीच असती .…

                                                                                                          - सुधीर 

No comments:

Post a Comment