Monday 3 February 2014

वैकुंठगमन :सत्य कि असत्य

.
             "when you have eliminated the impossible ,whatever remains ,however improbable ,must be truth "                                                                                                                                                                              हे शेरलॉक होम्स या प्रसिद्ध पात्राचे जनक सर आर्थर कोनन डोयाल याचं एक प्रसिद्ध वाक्य आहे . याचा अर्थ असा कि जेव्हा एखाद्या घटनेतून तुम्ही अशक्य अस सर्व वगळून टाकता तेव्हा जे काही उरत ते कितीही विचित्र असल तरी तेच सत्य असत . आज मी इतिहासातल्या एका घटनेकडे या नजरेने पाहणार आहे . ई.स. १५७७ ते इ.स १६५० या काळात महाराष्ट्राने संत तुकारामांच्या रूपाने एक वैचारिक झंझावात पहिला ज्याने त्याकाळच्या तात्कालिन धर्मसभेला पण हादरवून टाकले होते . आज मी बोलणारे त्या महान संत व माझ्यासारख्या भागवत धर्माची पताका हाती  घेऊन चालणाऱ्या असंख्य वैष्णवांच्या लाडक्या "तुकाराम" यांच्या मृत्यूबद्दल .. 
                        त्यांच्या मृत्यूबद्दल महाराष्ट्रात दोन विचार प्रवाह आहेत . एक असा कि तुकारामांना नेण्यासाठी वैकुंठातून विमान आले व त्यांना सदेह सोबत घेऊन गेले म्हणजेच तुकारामांचे वैकुंठगमन झाले ,तर दुसरा विचार असा आहे कि त्या काळच्या कट्टर धर्मियांनी तुकाराम महाराजांची हत्या केली व त्यांचे वैकुंठगमन झाले अशा वावड्या उठवल्या . आज आपण आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचा बारकाईने अभ्यास करू तेव्हा कुठल्याही विचार करणाऱ्या माणसाला हा दुसरा विचार पटेल .. 
                     आजचा काळ हा कायदा-सुव्यवस्थेचा काळ आहे असे म्हणतात ,कारण आपल्याकडे न्यायप्रणाली कायदे अस्तित्वात आहेत ,तरीपण या काळात सुद्धा एखाद्या देशाच्या राष्ट्रपतीला सुद्धा सुरक्षा पुरवावी लागते कारण देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेला व्यक्ती सुद्धा पूर्णपणे सुरक्षित आहे असे नाही . आज आपल्याकडे विचारस्वातंत्र्य ,बोलण्याचे स्वातंत्र्य ,जाहीरपणे मत मांडण्याचे स्वातंत्र्य असून सुद्धा जाहीरपणे आपले विचार मांडणारा सुरक्षित नसतो . याचेच उदाहरण म्हणजे नरेंद्र दाभोलकर .आजच्या कायदा-सुव्यवस्थेच्या काळात ,गुन्हेगारांना शिक्षा देणारी न्यायप्रणाली अस्तित्वात असण्याच्या काळात सुद्धा दाभोलकरांची हत्या होऊ शकते ,तेव्हा मोगलाई मध्ये प्रस्थापित धर्मसभेवर आसूड ओढनारे तुकाराम त्या काळात किती सुरक्षित असतील . तुकाराम महाराजांचा अंत झाल्यावर त्या काळाच्या ब्राह्मणांनीच अशी अफवा उठवली असणार कि तुकाराम महाराजांचे वैकुंठगमन झाले आणि त्या काळच्या भोळ्या लोकांनी त्यावर विश्वास ठेवला . तुकारामांना सदेह तथाकथित विमानातून जाताना कुणीही पाहिलं नव्हत ,म्हणूनच अंत झाल्यानंतर त्यांचा देह सुद्धा कुणाला पाहता आला नाही याची चोख व्यवस्था केली असणार त्या कट्टर धर्मियांनी ..
                          तुकाराम महाराज असो वा  ज्ञानेश्वर असो ,त्यांनी नेहमी सत्याचीच आस धरली म्हणून त्यांचे अनुयायी या नात्याने समस्त महाराष्ट्राने पण तुकराम महाराजांचे वैकुंठगमन झाले या भोळ्या समजुतीला मागे सारून सत्य कितीही नावडते असले तरीही ते स्वीकारले पाहिजे . आणि आपल्या इतिहासात अशा अनेक घटना आहेत ज्यांकडे आपण डोळसपणे पाहण्याची गरज आहे कारण सत्याचा रस्ता हा कितीही नावडता असला तरी तोच ईश्वराचा रस्ता असतो आणि असत्याचा रस्ता कितीही छान आवडता असला तरी तो ईश्वरपासून दूर नेणारा असतो हेच अंतिम सत्य ..…  

                                                                                                       - सुधीर 

No comments:

Post a Comment