Tuesday 25 February 2014

स्वातंत्र्यवीर सावरकर

               
                    आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी आणि आजच त्याचं चरित्र वाचायला माझ्या हाती पडल हे माझ भाग्यच .. त्यानिमित्त मला पु.ल.देशपांडे याचं एक भाषण वाचायला मिळालं .. १९८३ च्या याच दिवशी पु.ल अंदमान च्या सेल्युलर तुरुंगाला भेट द्यायला गेले होते ,ते सावरकरांवर एक लघुपट बनवत होते व त्यानिमित्त ते तुरुंग पाहायला गेले होते .हेच ते तुरुंग जिथे सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा झाल्यावर १४ वर्षे ठेवले होते ..
             तुरुंगाच्या कारागृहाच्या तिसर्या मजल्यावर पु.ल सावरकरांच्या कोठडीपर्यंत आले आणि ती पाहताच पु.ल नां गहिवरून आले . ते म्हणाले ,"तात्यांना इथे ठेवले होते ?". त्यांचा गळा भरून आला ,त्यांना पुढे काहीच बोलवेना . सतत हसणारे आणि दुसर्यांना हसवणारे पु.ल ,यांचे हे वेगळेच रूप होते . हळू-हळू पु.ल कोठडीत शिरले ,१३*७ ची ती खोली पाहून पु.ल चा गळा भरून आला . तिथे त्या काळोखात ,भिंतीवर असलेल्या सावरकरांच्या तैलचित्राला पु.ल नी पुष्पहार अर्पण केला . काही क्षण काहीच न बोलता पु.ल त्या तैलचित्राकडे पाहत राहिले . मग काही वेळात कारागृहाच्या मैदानात पु.ल नी हे भाषण दिले जे वाचून माझ्या पण डोळ्यात पाणी आल .. या भाषणाची PDF ची लिंक मी या लेखाच्या शेवटी दिली आहे ,तरी ती उघडून वाचावी ,म्हणजे आपणास पण कळेल कि या आपल्या भारत देशात अगदी दोन-तीन च महान लोकांचा उदो-उदो करून बाकीच्यांना सर्रास अडगळीत टाकले जाते ते फक्त घाणेरड्या राजकारणापायी ,आणि त्याला आपली साथ मिळते .. 
               आधुनिक काळात सावरकर असो वा नेताजी सुभाष चन्द्र बोस असो व शहीद भगतसिंग ,अशा अनेक महात्म्यांना राजसत्तांनी जाणून-बुजून अडगळीत टाकले आणि आपणही त्यांना विसरून गेलो .ज्यांनी आपल अख्ख आयुष्य या भारतमातेच्या चरणी अर्पण केल त्यांना याच भारताचे नागरिक कसे काय विसरू शकतो ,एवढे का आपण निष्काळजी झालोत ? इतिहासाबद्दलच एक वाक्य आपण नाही लक्षात ठेवत कि जी माणस त्यांचा इतिहास विसरतात त्यांची कधीच प्रगती होत नाही . अहिंसा ,धर्मनिरपेक्षता हि तत्वे पाळायलाच हवीत पण त्याचबरोबर अन्यायाचा प्रतिकार ,स्वधर्म आणि संस्कृतीचा अभिमान हा पण असायलाच हवा नाहीतर आपली अवस्था त्या पहारेकरी सारखी होईल जो एका संपूर्ण गावाच रक्षण करण्यात रात्र घालवायचा पण चोरट्यांनी त्याचच घर लुटून नेल .
                  देशासाठी सर्वाधिक काळ कुणी कारावास भोगला असेल तर तो विक्रम सावरकरांच्या नावावर जातो .जेव्हा त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली आणि त्यांना अंदमानच्या त्या तुरुंगातल्या कोठडीमध्ये आणले गेले तेव्हा आपल अख्ख आयुष्य या १३*७ च्या कोठडीत जाणार याच विचाराने काय अवस्था झाली असेल त्यांची . तरीपण हार न मानता ,न खचता सावरकर त्या कोठडीत १४ वर्षे राहिले ,कशासाठी ?  तर फक्त देशासाठी . आज आपल्याला साधे २४ तास एकटे राहावे लागले तर काय अवस्था होते आपल्या मनाची ,तर विचार करा १४ वर्ष कशी काढली असतील सावरकरांनी .आणि नुसती ती वर्ष काढली नाहीत तर त्यात पण त्यांनी खचून न जाता ,आता माझ कस होणार ?या असल्या नकारात्मक विचारांच्या आहारी न जाता जिद्दीने स्वतःचे विचार त्यांच्या लिखाणातून ,त्यांच्या कवितांमधून मांडत राहिले .. 
               आपल आयुष्य सुद्धा एका कोठडीत घालवायला तयार असणारे ते वीर सावरकर पाहता आणि आज त्यांना आणि त्यांच्या विचारांना विसरत चालणारी तरुण पिढी पाहता ,अस वाटत कि सावरकर मुक्त जगाच्या प्रकाशातून कोठडीच्या अंधारात जाउनपण खर्या अर्थाने प्रकाशात गेले ,आणि आपण मुक्त जगाच्या प्रकाशात असूनही अजूनपण अंधारातच वावरत आहोत .. पु.ल च्या त्या भाषणाची हि लिंक ,यावर क्लिक केल्यास ते भाषण वाचायला मिळेल आणि मला खात्री आहे कि हे भाषण नक्कीच प्रेरणादायी वाटेल आणि आपण नक्की काय विसरत चाललो आहोत याची पण प्रचीती येईल वाचणार्यांना … 
http://www.savarkar.org/files/u1/PL_Deshpande_on_Savarkar.pdf
                 

                                                                                                                   - सुधीर 

No comments:

Post a Comment