आजकाल लोकांचा जगण्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन फार विचित्र झालेला आहे .. आपल घर ,आपल कुटुंब ,आपला पैसा यापलीकडे कोणी कोणाचा विचार करायला तयारच नाही .. याबातीत शिवाजी महाराजांवर व्याख्यान देत समाजजागृतिचा प्रयत्न करणारे नितीन पायगुडे पाटील याचं वाक्य मला फार आवडत .. ते म्हणतात आजकालच्या तरूणांच आयुष्य फक्त ३ गोष्टींवर फिरत राहत ,'माझी गाडी ,माझी माडी आणि माझ्याच बायकोची गोल गोल साडी ' .. आणि हे खर आहे ,आजकालचे तरुण-तरुणी पाहता ,समाजात सुधारणा कशी होईल याबद्दल कुणी फेसबुक च्या कमेंटच्या पलीकडे जाऊन प्रयत्न करताना दिसत नाही .. देखावा करणाऱ्यांची संख्या खूप वाढलीये ,आणि खरी काळजी करणाऱ्यांची संख्या कमी झालीय ….
स्वतः चा फोटो सेल्फी या गोंडस नावाखाली सगळ्यांना दाखवणारे खूप आहेत ,पण स्वतःच 'स्व' अर्थात 'सेल्फ' ओळखून ते जगासमोर मांडणारे फार कमी आहेत .. फेसबुक वर दुसऱ्यांच्या फोटो ला धडाधड लाइक करणारे तर खूप आहेत पण त्यांच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यात असणाऱ्या ,जी साक्षात जिवंत हाडामासाची बनलेली माणसे असतात , त्यांना व त्यांच्यासोबतच्या असणाऱ्या नात्यांना मनापासून लाईक करणारे फार कमी आहेत .. या बाबतीत एक वाक्य मला सांगावस वाटत ,कि आजच्या जगात जिथे जग आणि जगण याचा विचार करणाऱ्या माणसांची कमी आहे ,तिथे जे कोणी असा विचार करत असतील ,त्यांनी शांत न राहता त्यांचे विचार मांडणे फार गरजेचे आहे ,कारण समाजाची नैतिक मुल्ये वाढवण हि काळाची व समाजाची गरज होऊन बसली आहे …
मला हा हि प्रश्न विचारला एकाने कि तू फक्त जगण ,नाती किंवा मानवी भावना याबद्दल का लिहितोस ,समाजात घडणाऱ्या चुकीच्या घटनांबद्दल का नाही लिहित ? माझ अस मत आहे कि आपण समाजातली प्रश्ने तेव्हाच सोडवू शकू जेव्हा आपल्याला मनात पडणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे आपणास मिळतील ,आपण समाजाचं मन तेव्हाच ओळखू शकू जेव्हा आपण आपल्या मनाला ओळखू शकू ,समाजासोबत आपल नात तेव्हाच घट्ट होईल जेव्हा आपल्या घराच्या माणसांसोबत आपली नाती घट्ट होतील .. शेवटी कवी दत्त हलसगीकर यांच्या कवितेतल्या काही ओळी सांगाव्याशा वाटतात .. ते म्हणतात
ज्यांची बाग फुलुनी आली
त्यांनी दोन फुले द्यावीत
ज्यांचे सूर जुळुनी आले
त्यांनी दोन गाणी द्यावीत …
आभाळी एवढी उंची ज्यांची
त्यांनी थोडं खाली यावे
मातीत यांची जन्म मळले
त्यांना खांद्यावरती घ्यावे ….
- सुधीर
9561346672
9561346672
Beautiful..
ReplyDeleteThanks ..
Delete