नातं ..
मग ते नातं कुठलंही असो ..
ते हळुवारपणे खुलण्यातच खरी मजा असते ..
पण आजकाल सर्वांनाच घाई झाली आहे .. सर्व गोष्टींची घाई ..
नातं पटकन तयार व्हावं आणि या पटकन तयार झालेल्या नात्याची वीण मात्र आयुष्यभर टिकावी अशीच अपेक्षा करतात अन इथेच फसतात हि मंडळी ..
जस प्रत्येक कळी तिच्या कलेकलेने खुलते ,जस प्रत्येक झाड त्याच्या कलेकलेने वाढत ,तसंच या नात्यानासुद्धा कलेकलेने खुलू द्यायचं असत ..
मग असंच खुलता खुलता पुढे जाऊन त्या नात्यात एक घट्ट आणि कधीच न तुटणार बंध तयार होतो , जो कायम राहतो, चिरकाल टिकतो ..
त्यासाठी पाहिलं ते नातं जुळेल .. मग ते त्याच्या कलेने खुलायला लागेल .. आणि मग त्या नात्याची सुंदर अशी कळी खुलेल ..
पण त्या नात्याला असं खुलण्यासाठी योग्य वेळ नाही दिला तर ते नातं चिरकाल टिकेलच याची शाश्वती नाही ..
म्हणून सावकाशपणे जुळू द्या या नात्यांना ..
हळुवार असं खुलू द्या या कळीला ..
त्यानंतरच खरं हि कळी जोमाने खुलेल ..
अन आयुष्यात आनंदाचा , प्रेमाचं सुगंध पसरेल ..
- सुधीर