Sunday 29 September 2013

Intelligent Heroes

             
            मला आवडणार एक छान वाक़्य आहे ." जर एखाद्या देशातल्या वा समाजातल्या तरूणांच मन जाणून घ्यायचं असेल तर त्या पिढीचे आवडीचे गाणे ऐका '" . म्हणजेच तरुणांच्या मनावर राज्य करणाऱ्या ,त्यांना आवडणाऱ्या गाण्यातून त्यांच्या मनात डोकावता येत . हेच वाक़्य माझ्या मते सिनेमा आणि मालिकानाही लागू होते .
             परवा माझ्याकडे डाउनलोड केलेले 'शेरलॉक' या मालिकेचे एपिसोड पाहत होतो . तेव्हा हा विचार मनात आला कि आपल्याकडे अशा मालिका का नाही बनवल्या जात ,ज्यात नायक-नायिकांच्या तथाकथित Six pack पेक्षा  बुद्धिमत्तेवर भर दिला जातो .वरच्या 'शेरलॉक' या मालिकेत नायकाच्या दिसण्यापेक्षा त्याची बुद्धिमत्ता दाखवण्यावर भर दिला आहे . नायक एकदम सडपातळ आणि एकदम उंच दाखवलाय तर elementary या मालिकेत नायक जवळपास टकलाच दाखवलाय ,हेच आपल्याकडे होईल का ? अर्थात वर सांगितलेल्या नायकांची अभिनय क्षमता उत्तमच आहे आणि आपल्याकडेही उत्तम अभिनय करणाऱ्यांची कमी नाहीये ,पण आपण मागे पडतो ते पाहण्याच्या view मध्ये . 
           हॉलीवूड चे खूप सिनेमे असे आहेत ज्यात नायकाचे जे पात्र असते त्याच्या बुद्धीच्या क्षमतेवर पूर्ण सिनेमा आधारित असतो . भलेही तो सिनेमा 'काल्पनिक' या वर्गवारीत बसत असेल तरीपण त्यातल्या intelligent नायकाच्या पात्राचा प्रभाव साहजिकच तिथल्या तरुण पिढीवर पडतच असणार .
Nikolas Cage चा 'National treasure 1&2' , Robert douny Jr चा 'sherlock holmes 1&2' ,Dannial Crag चा 'Casino Royal ' ,Brad pitt चा 'Ocean eleven 1,2&3' ,Tom cruise ची 'Mission impossible series' ,Matt damon ची  'Bourne series' ,Dennis Quad चा 'Vintage point' अशी काही सिनेमांची यादी . तर Benedict cumberbatch चा Sherlock , Johnny lee miller चा elementary , तसेच Criminal minds , The mentalist , Psych या काही मालिका . या सर्वात आणि अजूनही खूप सिनेमांमध्ये व मालिकांमध्ये नायकाच्या सुंदर पिळदार दिसण्यापेक्षा त्याच्या अभिनयावर भर दिला आहे ,नायकाच्या पात्रात त्याच्या मारधाड करण्यापेक्षा त्याच्या बुद्धीच्या जोरावर संकटांवर मात करण्यावर भर दिला आहे . 
             उलटपक्षी आपल्याकडे रावडी राठोड ,दबंग ,एजन्ट विनोद ,देवदास ,रांझना ,खिलाडी ४२० यासारख्या सिनेमातून आपण कसले आदर्श उभे करत आहोत तरुणांपुढे . कदाचित यामुळेच आज चंगळवाद पसरत चालला आहे आणि नवीन कल्पना ,नवीन आयडीया यांच्यापेक्षा फक्त शरीरप्रदर्शन ,खोटे व तथाकथित high standards याचाच विचार बहुतांश तरुण करताना दिसत आहेत . आपले भारताचे मौल्यवान आदर्श विसरून ,बुद्धिवादाला बाजूला सारून फक्त बाह्यशरीरावादाला आपण प्रोत्साहन देत आहोत . अर्थात special 26 ,सरफरोश ,तारे जमीन पर यासारख्या सिनेमातून वा सत्यमेव जयते ,नवीन महाभारत यासारख्या मालिकांमधून बुद्धिवादाला प्राधान्य दिल जातंय पण हे प्रमाण खूपच कमी आहे . त्यामुळे आतातरी हि दृष्टी बदलली पाहिजे ,फक्त box office किंवा टीआरपी साठी जो मसालाबाजी चा बाजार मांडला आहे तो कमी झाला पाहिजे आणि पात्रातील नायाकांद्वारे आपले तरुण प्रेरणा घेऊ शकतील असे दर्जेदार आणि बुद्धिप्रामाण्यावादी नायक दाखवले गेले पाहिजेत . 

No comments:

Post a Comment