Monday, 31 August 2015

आठवण येतेय एका मुलीची ....


                      परवा एका मुलीची ,एका मैत्रिणीची खूप आठवण येत होती ,बहुधा सध्या ती बरीच दूर ,महाराष्ट्राच्या सुद्धा बाहेर असल्याने कदाचित .. या ब्लॉग वरची पहिली कविता सुद्धा तिच्याच साठी होती ,आणि आजची हि कविता सुद्धा तिच्याच साठी आहे .. आणि जेव्हा हे शब्द सोबतीला असतील तेव्हा मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी हे दूर असलेल अंतर सुद्धा आडवे नाही येत.. म्हणून त्या माझ्या मैत्रिणीसाठी एक खास कविता ,काही ओळी माझ्या मनातल्या ,काही भावना माझ्या मनातल्या ,एक संदेश माझ्या मनातला ... 
                                 
आठवण येतेय एका मुलीची 
आयुष्यात आलेल्या 
पहिल्या वहिल्या मैत्रिणीची 
आठवण येतेय 
माझ्या दिदीची ,माझ्या बहिणीची … 

जन्म झाला तिचा तेव्हा 
हळूच चोरून बघायचो तिला 
आईच्या कुशीत निजलेल्या 
त्या बाळाची 
उगाचच का भीती वाटायची बर मला … 

आईच्या कुशीत हि कोण आली 
म्हणून कदाचित 
भीत असेन मी तिला 
तरीपण रडण ऐकू आल की 
चोरून बघत असेन मी तिला … 

एकदा धीर धरून गेलो तिचा जवळ 
आई म्हणाली जवळ  हिला 
अरे वेड्या छोटी दीदी मिळाली तुला … 

आता आठवत नाहीये की 
बाळाला त्या पाहून काय बोललो असेन 
पण छोटस ते गुबरु बाळ पाहून 
मी गालातल्या गालात हसलो नक्की असेन 

तीच होती माझी दीदी ,आणि 
जी झाली माझी पहिली-वाहिली मैत्रीण 
तिच्यामुळे शिकायला मिळालं 
काय असत भाऊ असंण ,
आणि काय असत 
कुणालातरी आपल मानून 
तिची काळजी घेण .. 

तेव्हा जी होती जवळ खूप माझ्या 
आहे आहे ती खूप दूर 
पण संपेल हा दुरावा सुद्धा 
येईल आमचा दिवससुद्धा ,
जेव्हा ती असेल ,आणि मी असेल 
आणि असेल आमची मस्ती … 

ते एकमेकांच्या खोड्या काढण ,आणि 
आई बाबांचं लाडक कोण यासाठी 
नेहमी नेहमी भांडण ,
भांडून झाल की रुसवा फुगव धरण 
अन हळू हळू पुन्हा बोलायला लागण … 

आज आठवण येतेय त्या मस्तीची ,
आठवण येतेय त्या मुलीची 
आयुष्यात आलेल्या 
पहिल्या वहिल्या मैत्रिणीची 
आठवण येतेय 
माझ्या दिदीची ,माझ्या बहिणीची … 

Missing You ....To my didi ,my sister 
From your bhaiya ... 


                                                                                                 -सुधीर
                                                                                -




Wednesday, 26 August 2015

त्या अनोळखी वाटा …


                                 ती अनोळखी सफर
                                 त्या अनोळखी वाटा …
               अशीच एक काहीसी अनोळखी सफर मला करावयास मिळाली .. प्रत्येक सफर काहीतरी नवीन शिकवते अस म्हणतात ,तसच या सफरीतून मी एक गोष्ट नक्की शिकलो ,कि समोर येणाऱ्या अनोळखी वळणांना घाबरण्यापेक्षा ,त्या वळणांच्या पुढे काय आहे याची चिंता करण्यापेक्षा त्याला सामोरे गेलात तर त्या वळणाच्या पुढे तुम्हाला सापडेल अस काही सौदर्य ,असा काही अनुभव ,असे काही क्षण जे अपेक्षेपेक्षा जास्तच काहीतरी देतात आपल्याला .. 
              मित्रांसोबत गेलेल्या या सफरीत ,रस्त्यात अचानक अशी काही अनोळखी वळणे ,अशा काही अनोळखी वाटा येत होत्या ,तेव्हा अस वाटायचं कि या वळणावरती पुढे जायचं का नाही ,या अनोळखी वळणाच्या पुढे काय असेल ,जे असेल ते धोकादायक तर नसेल न ,या अनोळखी वाटेने पुढे गेलो तर परत येताना काही अडचण तर नाही ना येणार ,अशा एक ना अनेक प्रश्नांनी ,शंकांनी मन भरल होत .. तरी आम्ही ती अनोळखी वळण पार केली ,त्या अनोळखी वाटांवर पुढे जात राहिलो .. आणि कमालीची गोष्ट म्हणजे ,आम्हाला प्रत्येक वळणानंतर अशा काही जागा दिसल्या ,अशा काही घटना घडल्या ,अशा काही गोष्टी आम्हाला करायला मिळाल्या ,कि त्याच गोष्टी ,त्याच क्षणांनी प्रवासाच्या परतीच्या वेळेस आमच्या चेहऱ्यावर हसू आणलं ,त्याच क्षणांनी आम्हाला एक अतिशय सुंदर अस आठवणींचा साठा दिला जो आम्ही कायम सोबत ठेऊ आणि तो आठवून गालातल्या गालात हसू सुद्धा ..                
                आपल आयुष्य पण असच काहीस असत नाही का ,प्रत्येक येणारे अनोळखी वळण ,प्रत्येक येणारी अनोळखी व्यक्ती काहीतरी जगण्याचा अनुभव शिकवते आपल्याला .. एका अनोळखी मुलासोबत क्लास मध्ये सहज म्हणून बोललो ,आणि आज तो माझा जिवलग मित्र आहे ,एका अनोळखी मुलीला काळजीने दोन शब्द बोललो तर ती आज माझी मानलेली बहिण आहे ,अनोळखी शहरात कोणासोबत तरी बोलायची सुरुवात झाली आणि तेच पुढे कायमचे मित्र झाले आणि जे जे कोणी आयुष्यात आहेत ,ते सर्व त्या क्षणाला अनोळखीच होते .. पण त्या वेळेला ,त्या अनोळखी वाटेने गेल्याने आज हि नाती आहेत माझ्या आयुष्यात .. जर पुढे काय होईल या विचाराने त्या अनोळखी वाटेने गेलोच नसतो तर कदाचित ही आज अनमोल अशी वाटणारी सर्व नाती कदाचित नसती माझ्या आयुष्यात ..  हो ,अशा अनोळखी वळणांवर कधी कधी त्रास सुद्धा झाला ,मन सुद्धा दुखावल गेल ,मात्र तो हि अनुभव आयुष्याच्या शिदोरीत कधीतरी कामाला येईलच .. 
               मला मान्य आहे की ,ओळखीच्या वाटांनी जाताना चांगल वाटत ,आणि अनोळखी वाटा थोड्याशा भीतीदायक वाटतात .. कारण माहित नसलेल्या गोष्टीना आपण थोडफार का होईना पण भीतच असतो .. पण तीच भीती बाजूला सारून पुढे जात राहिलो तरच आयुष्याची हि अनुभवाची शिदोरी वेगवेगळ्या क्षणांनी ,घटनांनी भरत जाते ,आणि याच शिदोरीला आपण जगण अस म्हणतो ,नाही का ..
                            म्हणूनच ..
                                ती अनोळखी सफर ,त्या अनोळखी वाटा
                                जगण म्हणजे  हेच
                                जगण्याच्या अथांग समुद्रावर ,अनोळखी अशा क्षणांच्या लाटा ……


                                                                                                                   -सुधीर

Saturday, 22 August 2015

तुझा साथ हवा आहे ....


                      अस नेहमी म्हणतात कि माणूस या जगात एकटाच येतो आणि जाताना एकटाच जातो .. कदाचित अस असेलही ,पण हे येण आणि हे जाण याच्या दरम्यान जो 'जगण ' नावाचा भाग असतो ,त्या मध्ये आपण एकटे नाही राहू शकत .. आपल्याला गरज असते एका साथीची ,साथ देणाऱ्या अशा साथीदाराची जो या जगण्याला खऱ्या अर्थाने 'जगण' बनवतो .. मग तो साथीदार ,ती साउली जी आयुष्यात आल्यावर आयुष्य कस असेल याबद्दल माझ्या मनातल थोडस .. 
                                                               

 तुझी मैत्री हवी आहे 
तुझा हात हवा आहे
    जीवनात आता प्रत्येक क्षणी 
    तुझा साथ हवा आहे …… 
  
  तुझा राग तुझा रुसवा 
माझ्यावरती असायलाच हवा
   पण त्या रागात कुठेतरी
    प्रेमाचा पाझर असायला हवा ……


तुझ हसण तुझ बडबड करण 
मला ऐकायचं आहे नेहमी 
आणि ते ऐकत असताना 
        त्या तुझ्या बोलण्यात हरवायचं नेहमी ……


तु हसताना मला तुला पहायचंय  
मात्र तू रडली कि तुला खूप खूप हसवायचं 
तुझ्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणात 
तुला फक्त आणि फक्त आनंदात पहायचंय ……


तुझे शब्द हवे आहेत 
ज्यांनी मला आधार दिला 
आता तुला सर्वस्व बनवण्याचा 
मी पक्का इरादा केला .....


तुझ प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी 
द्यायची आहे मला तुझी साथ 
आता तुझी स्वप्न पूर्ण करण 
हीच माझ्यापण स्वप्नांची वाट ..... 


माझ्या या भावना समजून घ्यायला 
तुझा समंजसपणा हवा आहे 
मी आहे थोडसा वेडाखुळा
म्हणून तुझा साथ हवा आहे ..… . 
                                                                  तुझा साथ हवा आहे ......… 


                                                                                                  -सुधीर 

Wednesday, 19 August 2015

ओ रे मनवा तू तो बावरा है ....


                                  'ओ रे मनवा तू तो बावरा है' .. हे हिंदी गीत ऐकता ऐकता मनात विचार आला कि खरच रे मना ,तू किती वेडा आहेस .. तू कधी कुठ कसं धावशील हे सांगता येत नाही .. कधी या वाटेने तर कधी त्या वाटेने ,नेहमी कशाच्यातरी मागे ,कोणाच्यातरी मागे ,कधी स्वप्नाच्या मागे तर कधी सत्याच्या मागे ,तू नेहमी धावत असतोस ..
                 खरच वेड असतं हे मन .. याला जगाची दुनियादारी अजिबात समजत नाही .. हा आपला स्वतःच्याच नादात असतो .. कोणीतरी आवडलं कि तिच्याच मागे धावत बसतं ,ती समोर असो वा नसो मात्र याला काहीच फरक नाही पडत .. कोणी थोडस प्रेम दिल कि लगेच पघळतो ,आणि कोणी जरासं मनासारख नाही वागाल तर लगेच रुसून फुगून बसत .. अशा रुसलेल्या फुगलेल्या मनाला मनवायची पण गरज नसते मग ,समोरच्या व्यक्तीच्या सोबतीमध्ये हे मन झालेलं सर्व आपोआप विसरून जात ,इतक साध भोळ असत हे मन ..
                  मनापासून साथ देण हे खर तर मनाकडून शिकावं ,कोणतीही परिस्थिती असो ,कोणताही प्रसंग असो ,हा नेहमी साथ आणि साद देत असतो .. काही चुकीचं करत असेल तर 'हे चूक आहे ' अशी साद देणार हे मनच असत ,आणि काही योग्य अस करत असेन तर माझ्या चेहऱ्यावर हसू फुलवायचं काम हे मनच करत .. याला आवडणाऱ्या व्यक्तीचे शंभर नखरे सुद्धा हा हसत हसत सहन करेल पण नावडत्या व्यक्तीने एक जरी चूक केली तर हे त्याला कधीच माफ न करायच्या अविर्भावात त्याकडे पाहते ..
                खरच हे मन नसत तर जगायची मजा आलीच नसती .. कितीही वय झाल तरी आपल्या आतल ते लहानपण ,तो लहान निष्पाप मुल जिवंत ठेवायचं काम हा मनच करतो .. मन खर तर आपल्या आतलं ते खट्याळ खोडकर बाळच असत .. पहा ना ,हे याला जे आवडेल तेच करत ,आवडेल तिकडेच धावत ,आणि याला आवडत नसेल ते करायला लावलं कि मात्र लगेच बंड करून उठत ,छोट्या छोट्या आनंदात हे अगदी मनसोक्त नाचत ,आणि छोटस दुख आलं कि लगेच रडायला लागत .. अस हे लहान मन ,जेव्हा मोठेपणा दाखवायचा प्रसंग येतो तेव्हा  हे डोळस ,हुशार व्यक्तीलाही मागे टाकत ,म्हणूनच कदाचित 'मनाचा मोठेपणा' हा वाक्यप्रचार रूढ झाला असावा .. 
               अस हे वेड मन ,हे वेड आहे म्हणूनच जगायची मजा अनुभवता येते .. नाहीतर विचार करा ना ,की सगळेच कायम अख्खं आयुष्य डोळसपणे ,बुद्धीने ,समजूतदारपणे वागत असते तर किती कंटाळवाण झाल असत हे जग .... म्हणूनच 

ओ रे मनवा तू तो बावरा है ,तू ही जाने तू क्या सोचता है
क्यो दिखाये सपने तू सोते जागते ….  

                                                                                                  - सुधीर