Saturday 19 April 2014

मना अवकाशु ......

             
                    ज्ञानेश्वरांच्या एका श्लोकात एक ओळ आहे  " मना अवकाशु ।" .. याचा अर्थ आपल मन आकाशाप्रमाणे मोकळ राहू द्या जेणेकरून त्यात येणारा प्रत्येक विचार ,प्रत्येक आवाज मुक्तपणे मोकळेपणे ,मनसोक्त फिरू शकेल ..
            पण आपल मन खरच कधी मोकळ असत का हो ? मनात येणाऱ्या प्रत्येक विचाराला कधी मोकळेपणाने आपल्या मनात वाऱ्यासारखं फिरू दॆतच नाही आपण ..  त्या विचाराला अडथळा आणतो तो आपल्याच काही पूर्वग्रहाचा ,आपणच घालून घेतलेल्या काही समजुतींचा .. जस डेरेदार झाडाच्या पाना-फुलातून ,फांद्यातून वारा मनसोक्त हिंडतो ,कधी इकडून तर कधी तिकडून ,अगदी निवांतपणे त्याचा संचार चालू असतो , अगदी तसाच आपल्या मनातल्या विचारांना मुक्तपणे संचार करू दिला तर … 
           जेव्हा आपल्याशी कोणी काही बोलत असत तेव्हा आपण त्याच बोलन ऐकताना सुद्धा मनात काहीतरी पूर्वग्रह ठेउनच ऐकत असतो आणि त्याच पद्धतीने आपण त्याचाशी बोलतो पण .. म्हणूनच एखाद्याच्या तळमळीने विचारलेल्या "कसा आहेस ?" या प्रश्नालासुद्धा  "ठीक आहे " यासारखी साधी उत्तरे देतो आपण .. जेव्हा कुणी आपल्याशी बोलू लागत तेव्हा आपण मनातल्या मनात विचार करू लागतो ,कि ती व्यक्ती कोण आहे ,ती आपल्याला आवडते कि नाही आवडत ,त्याने आत्तापर्यंत काय काय केले आणि तो तुमच्याशी कसा कसा वागला ,यासारख्या विचारांमध्येचं आपण त्याच बोलण ऐकत राहतो ..  अशाने त्याचा आवाज ,त्याला जे बोलायचं आहे ते ,त्याचे विचार आपल्या मनात मुक्तपणे फिरतच नाहीत ..
          अनेक घरांमध्ये हे होत ,कि आई-वडील मुलाला काहीतरी सांगत असतात समजावून आणि तो मुलगा मात्र त्याचा गेम मध्ये अथवा टीव्ही मध्ये मग्न असतो .. तेव्हा त्यांचा आवाज याच्या कानापर्यंत पोहोचत असतो ,कदाचित त्याच्या मनापर्यंत सुद्धा पोहोचत असतो पण " ह्याचं नेहमीचच आहे सांगण " असा पूर्वग्रह मनात ठेवल्याने तो आवाज मनात त्याच्या कानात मुक्तपणे फिरत नाही आणि आई-वडिलांना जे मुलाला म्हणायचय ते त्याला कधी समजतच नाही ... 
          अस तुमच्याही बाबतीत होत असेल ,जेव्हा कुणीपण तुमच्याशी बोलत तेव्हा तुम्ही तुमच मन मोकळ ठेऊन किती जणांच ऐकता ? एकदा ऐकून पहा ,त्या आवाजाला तुमच्या मनापर्यंत पोहचू द्या , कारण येणारा प्रत्येक आवाज ,त्यामागची भावना ,त्यामागचा विचार हा वेगळा असतो ,त्याला मनसोक्त तुमच्या मनात फिरू द्या .. प्रत्येक विचारांची वेगळी बाजू तुम्हाला दिसून येईल , प्रत्येक गोष्ठीची ,प्रत्येक व्यक्तीची वेगळी बाजू तुम्हाला दिसून येईल ... आणि कदाचित एक वेगळचं जग तुम्हाला दिसू लागेल ... 
         
                                                                                                                      - सुधीर
                                                                                                                       

                   

No comments:

Post a Comment